Cm bhagwant mann : नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : मुख्यमंत्री भगवंत मान
नांदेड| सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा, त्याग आणि बलिदानाची पवित्र भूमी असून या भूमीवर होत असलेला शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री मान म्हणाले की, सेवा हाच खरा धर्म असून या शहीदी समागमाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, कार्य व त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून त्यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नांदेड येथी...
