साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL
नवे शैक्षणिक वर्ष सुरुच होते आहे. कोणत्याही शैक्षणिक वर्षात कुठेही एकही शाळाबाह्य विद्यार्थी असू नये, असा राज्य सरकारचा दंडक आहे. स्तंभलेखक व शिक्षक मारोती कदम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत प्रवेश दिला. परंतु त्यापैकी एका मुलाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांनी या वास्तव घटनेचे लेखस्वरुप चित्रण केले. वाशीम जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एका मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्या कुटुंबावर आलेला काळाचा घाला म्हणजे मारोती कदम यांचा लेख म्हणजे 'निष्पाप बळी' होय. कदम हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अशा घटना त्या कदमांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत त्या कागदावर शब्दबद्ध होणारच! ते जसे संवेदनशील लेखक आहेत तसे ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वात रमणारे बालमूलक शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत म्हणजे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील...
