Nanded ✈️ नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद
नांदेड | शहराच्या मध्यभागी असलेले बहुचर्चित नांदेड विमानतळ एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बंद पडले असून, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत थेट जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे.
मारावार म्हणाले की, अनेक वर्षे नांदेड विमानतळ रिलायन्स समूहाच्या ताब्यात होते. परंतु, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हट्टापायी विमानतळाचा कारभार रिलायन्सकडून काढून घेऊन अनुभव नसलेल्या एमआयडीसीकडे दिला.
🔹 एमआयडीसीचा शून्य अनुभव
मारावार यांनी आरोप केला की, एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे अनेक मोठे उद्योगधंदे आधीच बंद पडले आहेत. अधिकारी भूखंडांच्या दलालीत मश्गूल असताना, विमानतळ चालवण्याचा अनुभव नसताना त्यांच्याकडे ताबा दिल्यामुळे विमानतळ "खड्ड्यात" गेला.
🔹 धावपट्टीवर भेगा – प्रवासी हैराण
नांदेड विमानतळावरून दररोज जवळपास ५०० प्रवासी जगप्रस...
