हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील विजयमाला जयवंतराव कदम हिने शिक्षक पदासाठी झालेल्या TAIT परीक्षेत तब्बल 146 गुण मिळवत गाव, कुटुंब व गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे.


विजयमालाचे शैक्षणिक पात्रता उल्लेखनीय आहे. तिने एम.ए. अर्थशास्त्र (सेट – अर्थशास्त्र), एम.ए. मराठी, बी.एड., एम.एड. तसेच CTET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामागे परिश्रम, गुरुजनांचे मार्गदर्शन व परिवाराचे आशीर्वाद हेच बळ ठरले.


या यशानिमित्त करंजी येथील मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी सर व कै. श्री. दे. वी. सरसम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावचे पोलिस पाटील बापूराव मिराशे, कापसे गुरुजी तसेच नवोदय क्लासेस, हिमायतनगरचे मार्गदर्शक प्रा. सज्जन कदम (ॲडव्होकेट) उपस्थित होते.


सत्कार सोहळ्यावेळी विद्यार्थिनीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तर गुरूंच्या डोळ्यांत अभिमानाची चमक दिसून आली. “गुरूंच्या पावलावर चालणारा विद्यार्थी मोठे यश संपादन करतो आणि त्याचा सत्कार पुन्हा गुरूंच्याच हस्ते होतो, ते क्षण दुर्मिळ ठरतात,” असे मान्यवरांनी सांगितले. हा सत्कार केवळ विजयमालाचा नाही तर संपूर्ण गावाचा अभिमान आणि प्रेरणा ठरला आहे.



